Ladki Bahin PM Kisan Recovery Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आणि पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) या योजनांचा लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थ्यांकडून ४,००० कोटी रुपये वसूल करण्याच मोठ चॅलेंज सरकार समोर आहे.
महाराष्ट्रातील ३० लाख महिलांनी लाडकी बहिण योजनेतून ₹१,५०० च्या सहा हफ्त्यांचे लाभ घेतले आहेत, पण या महिलांचा पात्रतेशी काही संबंध नाही. त्याचप्रमाणे, १२ लाख शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेतून त्रैमासिक लाभ घेतला आहे, परंतु त्यांचाही पात्रतेशी काही संबंध नाही.
निवडणुकीपूर्वी या योजनांचे फायदे अपात्र लाभार्थ्यांना दिले गेले होते. संबंधित विभागांनी या लाभार्थ्यांची तपासणी करणे सुरू केले असून, त्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. अनेक महिलांनी एकाच वेळी दोन योजनांमधून लाभ घेतल्याचीही अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारकडून लाडकी बहिण आणि पीएम किसान योजनेतून चुकीच्या पद्धतीने दिले गेलेले पैसे वसूल करण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात येत आहे. राज्यात सुमारे ६० लाख अपात्र लाभार्थी असल्याचा अंदाज आहे, ज्यांना पात्र नसतानाही योजनांचे लाभ मिळाले आहेत.
राज्य सरकारने योजनेतील काही लाभार्थ्यांच्या नोंदी योग्य करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी विविध तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. सध्या, सरकार किमान ६० लाख लाभार्थ्यांना कमी करण्याचे काम करत आहे.
🔴 हेही वाचा 👉 आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये, जाणून घ्या सविस्तर.
अधिकाऱ्यांनी सांगितले की काही महिलांनी स्वेच्छेने त्यांना मिळालेले पैसे परत दिले आहेत, पण भविष्यात या सर्व अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करणे तितके सोपे नाही. लोकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी एक तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली जात आहे, ज्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळून केवळ योग्य महिलांनाच मदत मिळेल.
राज्य सरकारला या वसुली प्रकरणात अनेक राजकीय अडचणीही येत आहेत, परंतु एकूणच, सरकार यावर ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
🔴 हेही वाचा 👉 आता फक्त या 5 कागदपत्रांवरच मिळणार PM विश्वकर्मा योजनेचा लाभ.