E Rickshaw Yojana Maharashtra: ई-रिक्षा साठी 3.75 लाख रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज

2 Min Read
E Rickshaw Yojana 2025 Maharashtra

E Rickshaw Yojana Maharashtra Online Registration Started : महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या वतीने ई-रिक्षा अनुदान योजनेअंतर्गत 3.75 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या योजनेत हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा किंवा फिरते दुकान रिक्षा खरेदीसाठी सहाय्य दिले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

योजनेसाठी पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • किमान 40% अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे.
  • वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराकडे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे

ई-रिक्षा अनुदानासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी.
  • दिव्यांगत्व प्रमाणपत्र.
  • UDID प्रमाणपत्र.
  • अधिवास व जातीचा दाखला.
  • ओळखपत्र व बँक पासबुक स्कॅन केलेले पेज.

अर्ज कसा करायचा?


E Rickshaw Yojana 2025 Maharashtra Apply Online:

  1. वेबसाईटला भेट द्या: MSHFDC संकेतस्थळावर जा.
  2. सूचना वाचा: योजनेच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
  3. अर्ज भरा: कागदपत्रांसह ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  4. पोच पावती मिळवा: अर्ज सबमिट केल्यानंतर पोच पावती डाउनलोड करा.
  • अर्जाची प्रक्रिया 22 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून 2 फेब्रुवारी 2025 (E rickshaw yojana 2025 maharashtra last date) पर्यंत अर्ज करता येईल.
  • योजनेच्या पात्रतेबाबत अधिक माहिती आणि मदतीसाठी MSHFDC संकेतस्थळावर दिलेला हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा.

E Rickshaw Scheme Maharashtra ही योजना केवळ दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी आहे. सर्वसामान्य व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 जानेवारी २०२५ सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा.

Share This Article